अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन


*अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन.

मुंबई, दि. 6 : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे

राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दीष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. परिक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रिया संदर्भातही कार्यवाही सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाच्या यंत्रणा सज्ज असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *